पीएम किसान ई-केवायसीला मुदतवाढ
लाभ घेण्याचे तहसिलदार अमोल निकम यांचे शेतकऱ्यांना
जाहीर आवाहन
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आले आहे. ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी
तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल अॅपमध्ये OTP द्वारे मोफत E-KYC करता येईल (सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली E-KYC तात्काळ करुन घ्यावी अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांचेशी संपर्क करावा सोबत E-KYC करण्यासाठी लिंक दिलेली आहे. https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
संगमनेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतक-यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. अद्याप संगमनेर तालुक्यात २१ हजार ७९८ शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. या शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत केवायसी करून घ्यावी, अन्यथा बारावा हप्ता बँकेत जमा होणार नाही, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार उर्वरित लाभार्थी यांनी
दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत E-KYC करणेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती तहसिलदार यांनी दिली आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रत्येक पात्र शेतक-याला वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये निधी दिला जात आहे. प्रत्येक चार महिन्याला २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. काही लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यावरील असलेले नाव तसेच आधार कार्डवर असलेले नाव यामध्ये फरक आढळून येतो. त्यामुळे या योजनेचा हप्ता पात्र शेतक-यांच्या बँक
खात्यावर जमा होतांना काही
अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतक-यास e-KYC प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले. ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ई केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात
आली आहे. त्यानुसार उर्वरित लाभार्थी यांनी दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत E KYC केली नाही. तर पुढील हप्ते मिळणार नाही. E-KYC करण्यासाठी लाभार्थी यांनी
नजीकचे सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र, CSC सेंटर मध्ये आधार कार्ड व मोबाइल घेऊन जावे.
केवायसी शंभर टक्के व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली होती. मात्र या प्रक्रियेस शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रक्रियेस ३१ मे, ३१ जुलै, १५ ऑगस्ट व ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती तरीही अद्याप संगमनेर तालुक्यातील २१, ७९८ शेतकऱ्यांची ई केवायसी केलेली नाही. या लाभार्थ्यांना ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसिलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी व गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केले आहे.

