सहसंपादक:- अरुण बिराजदार
*ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर देतात का कचऱ्यातून विष ??. असा प्रश्न डायघर ठाणे इथे सर्व स्थानिक भूमिपुत्र व रहिवासी यांना पडला आहे ?

देशात कचऱ्याची समस्या गंभीर असून दिवसंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम 2016ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याअगोदर शहरातील घनकचरा व्यवस्थापनच्या अपयशाची कारणं थोडक्यात अशी आहेत –
प्लास्टिकचा वाढता वापर
कचरा वर्गीकरणाचा अभाव
ठेकेदारांकडून कचरा व्यवस्थापनात दिरंगाई
नागरिक आणि कर्मचारी यांच्यातील क्षमताबांधणीचा अभाव
कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांची उदासीनता
डंपिंग ग्राउंडची पचन संस्था महत्त्वाची
शहराजवळच्या डंपिंग ग्राउंडची एक पचन संस्था असते. ज्याप्रमाणं मानवी पचन संस्थेत दैनंदिन आहाराचे पचन होऊन नैसर्गिकपणे चयापचय क्रिया घडत असते तसंच डंपिंग ग्राउंडवर येणाऱ्या कचऱ्याची नैसर्गिक प्रक्रियेद्वारे विल्हेवाट लावणं आवश्यक आहे.
आपली पृथ्वी पंचमहाभूतानं बनली आहे. त्यामुळे प्रत्येक घटक शेवटी पृथ्वीमध्येच विलीन होतात. या घटकांचं योग्य ‘व्यवस्थापन’ व्हायला पाहिजे. शहरातील कचऱ्यांचे ढिगारे हे प्रशासन आणि लोकांच्या उदासीनतेचं लक्षण आहे.
पण शहरातील सगळा कचरा जसं की, काच, प्लास्टिक, भाजीपाला, मृत जनावरे, लोखंडाचे तुकडे असं सगळं एकत्रच टाकल्यानं ते डंपिंग ग्राउंडमध्ये पचू शकत नाही. अशा ठिकाणी कचऱ्याचे ढीग वाढत राहातात. शेवटी शेजारच्या गावकऱ्यांना त्याचा त्रास होतो. त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
वर्गीकरण आवश्यक
मुळात नागरी घनकचरा ही समस्या नसून मिश्र कचरा ही समस्या आहे. 2000 सालापासून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि नागरी घनकचरा नियमानुसार शहरं स्वच्छ करण्याबाबत जनजागृती झाली. पण, संपूर्ण स्वच्छतेला खरा सूर सापडला नाही.
शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्याची वर्गवारी करणं अत्यंत गरजेचं आहे
‘राजकीय हस्तक्षेपाची’! प्रशासनाच्या कार्यपद्धतीत लोकप्रतिनिधींकडून वारंवार हस्तक्षेप होत असतो. यावर उपाय म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांशी थेट संपर्क ठेऊन, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी व लोकसेवक हे लोकांना त्रास नाही होणार या बाबतीत खबरदारी घेतली पाहिजे.
दरवर्षी लाखो टन कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या औद्योगिक समाजात विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या बनते. रिसायकलिंग, लँडफिल्स आणि जाळणे हे सर्व सोल्युशनमध्ये भूमिका बजावतात. कचऱ्यातील विषारी द्रव्यांचे परिणाम आणि त्याच्या उपस्थितीचे निव्वळ भौतिक वस्तुमान यामुळे अनेक ठिकाणी नगरपालिका आणि कचरा विल्हेवाट लावणाऱ्या संस्थांसाठी चिंतेचे कारण आहे.
काही लँडफिल्सचा आकार जवळजवळ अकल्पनीय आहे. न्यूयॉर्क शहराच्या बाहेर स्टेटन बेटावरील फ्रेश किल्स लँडफिल 2,200 एकर व्यापते. एवढा कचरा निर्माण करणार्या समाजात लँडफिल्ससाठी जमिनीचा वापर हा एक मुद्दा बनतो. विशेषत: दाट लोकवस्तीच्या, जपानसारख्या जास्त वापराच्या ठिकाणी, कचरा साठवण्यासाठी वाहून घेतलेली जागा रहिवाशांना त्रासदायक आहे. सोल्यूशन्समध्ये पुनर्वापर, पॅकेजिंग कमी करणे आणि वापर दर कमी करणे समाविष्ट आहे.
फेकल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या वस्तूंमध्ये विषारी पदार्थ असतात जे माती आणि पाण्यात मिसळू शकतात, ज्यामुळे वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये पारा, शिसे, कॅडमियम, क्रोमियम आणि पर्यावरणीय आरोग्याशी तडजोड करणारे इतर धातू असतात. बांधकाम कचऱ्यामध्ये एस्बेस्टोस, जीवाश्म इंधन डेरिव्हेटिव्ह आणि इतर विषारी पदार्थ असू शकतात. हे पदार्थ लाखो टन कमी विषारी कचऱ्याच्या आत विखुरले गेल्याने या पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे ते काढून टाकणे खूप समस्याप्रधान बनते.
कचरा आणि कचरा एका प्रचंड ढिगाऱ्यात टाकला की ते कुजायला लागतात. या सडण्याने मिथेन हा हरितगृह वायू तयार होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा कितीतरी पट अधिक शक्तिशाली आहे. मिथेन लँडफिलमधून बाहेर पडते आणि वातावरणात वर तरंगते, ज्यामुळे ग्लोबल वार्मिंगमध्ये योगदान होते. या समस्येवरील सर्वोत्तम उपायांपैकी एक हे प्रत्यक्षात फायद्यात रूपांतरित करते: जर मिथेन लँडफिलमधून बाहेर पडताना पकडले गेले तर ते जाळले जाऊ शकते आणि इलेक्ट्रिक पॉवरमध्ये बदलू शकते. हे सोल्यूशन आधीपासूनच अनेक लँडफिल स्थानांवर वापरले जात आहे.
घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा एक परिणाम जो कमी तीव्र आहे परंतु बर्याच लोकांना अधिक परिचित आहे तो म्हणजे दुर्गंधी. लँडफिल्सचे शेजारी अनेकदा त्यांच्या वासाची तक्रार करतात आणि हे एक कारण आहे की नवीन लँडफिल्सच्या प्रस्तावांना प्रस्तावित साइटच्या शेजारी वारंवार विरोध करतात. उर्जेसाठी मिथेनचा वापर करणारे प्रकल्प लँडफिलमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक वायूंचे प्रमाण कमी करतात, परंतु ते दुर्गंधी पूर्णपणे काढून टाकत नाहीत. लँडफिल्स ज्या आकारात वाढतात ते पाहता, वासाच्या समस्येवर सहज उपलब्ध उपाय नाही.
महासागरांवर मानवी कचऱ्याचा प्रभाव अधिक व्यापकपणे ओळखला जात आहे कारण प्रशांत महासागरातील “कचरा पॅच” ला व्यापक प्रसिद्धी देण्यात आली आहे, हे खंड युनायटेड स्टेट्सपेक्षा मोठे क्षेत्र आहे जे प्लास्टिकच्या कचऱ्याने व्यापलेले आहे. मानवी कचऱ्यामुळे महासागरांना निर्माण झालेल्या धोक्याचे हे केवळ सर्वात नाट्यमय उदाहरण आहे.
डायघर येथे स्थित जवळपास सर्व भूमिपुत्र संघटना व स्थानिक रहिवासी यांनी मुख्यमंत्री यांना या प्रकल्पाच्या विरोधासाठी मेल करून पत्र ही सादर केले आहेत त्यामध्ये डायघर गाव,पडले गाव, दहिसर मोरी,असे पंचक्रोशीतील सर्व गाव यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे त्यात शाळकरी मूल, ग्रामस्थ, सोसायटी चे सर्व रहिवासी,आणि स्थानिक नगरसेवक, आमदार सुद्धा आहेत .
पंचक्रोशीतील अध्यक्ष श्री संतोष पाटील यांचे असे म्हणे आहे आम्ही सातत्याने या प्रकल्पाचा विरोध करू कारण या प्रकल्पा मुळे या ठिकाणी राहणारे लोक हे आजारी होऊन मरतील व त्याला कोण जबाबदार राहील महापालिका प्रशासनाने आम्हाला भरपूर वेळा फसवले असताना आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची विषवास ठेऊ शकत नाही अन्यथा ते आम्हाला नकीच विष देऊन अजून आमचा विश्वास घात करतील.
तसेच डायघर स्थित शिवालीक सोसायटी चे सचिव आनंद पार्टे यांनी बोलताना हे सांगितले या ठिकाणी सदर प्रकल्पात शहरातून मोठ्या प्रमाणात ओला कचरा येणार असून त्याची विल्हेवाट लावून वीजनिर्मिती करणार अशी महापालिका आयुक्त सांगतात पण महापालिका आयुक्त यांना ज्ञान आहे का हा पहिला प्रश्नः आहे जिथे लोकवस्ती आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या कायदे अंतर्गत हा प्रकल्प या ठिकाणी लादताय.जरी प्रशासन आणि मुख्यमंत्री यांनी हा प्रकल्प लोकांना जीवे मारण्यासाठी इथे आणला असेल तर आम्ही रस्त्यावर येऊन मुख्यमंत्री यांना जाब विचारणार आणि इथे एकही नागरिकांना आरोग्य समस्या निर्माण झाला तर त्याला महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील.
पुढे सुनंदा सोसायटी ,गजरा बिल्डर,ग्रीन वूड्स, असे जवळपास ५० सोसायटी या मध्ये राहणारे १०,००० लोकांनी व पंचक्रोशीतील भूमिपुत्र लाखोंच्या संख्येने सर्वांनी मिळून या प्रकल्पाला मोठया प्रमाणात विरोध दर्शविला आहे .

