
नवी मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोना चं सावट वाढत आहे .अशाच वेळी जनतेला अनेक वेळा आव्हान करूनही जनता मास्क वापरण्यास टाळाटाळ करत आहे. याच धर्तीवर शासनाने पोलीस डिपारमेंट, महानगरपालिका तसेच ग्रामपंचायत क्षेत्र असो सर्वांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. आणि आज नवी मुंबई मध्ये कोपरखैरणे विभागात पोलिस डिपारमेंट नाकाबंदी करून गाडी चेक करत मास्क कारवाई करत आहे. ही कारवाई करत असताना अनेक नागरिक बिना मास्क आढळले आहेत. 200 ते 500 रुपयाचा दंड नागरिककांना भरण्यास भाग पडले आहे .तरीही नागरिक मास्क वापरण्यास टाळाटाळ करत आहे. कोरोना झपाट्याने वाढत आहे ,याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे

या मध्ये पालिका कुठेही कारवाई करताना दिसत नाही उलट कोपरखैरणे वॉर्ड ऑफिस मध्ये बिल भरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कुठलेही अंतर न ठेवता गर्दी दिसत आहे यावर कोण नियंत्रण ठेवणार असा प्रश्न पडला आहे

