औरंगाबाद येथे,केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, यांनी दूरसंचार विभागाच्या नवीन value added service बाबत सविस्तर चर्चा केली.
भारताला दूरसंचार सेवेत आत्मनिर्भर करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करून समाजमाध्यम,वृत्त,आरोग्य, शिक्षण, मनोरंजन सेवा लोकांना गुणवत्तापूर्ण व सुलभपणे देण्यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.तंत्रज्ञाबाबात जागरूक असलेले वैष्णव यांच्यामुळे देशात दूरसंचार तंत्रज्ञान गतीने विकसित होत आहे.नुक्तीच 5जी सेवाही सुरू झाली आहे.सामान्य नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहिती अधिक वेगाने मिळेल असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

