सहसंपादक :- अरुण बिराजदार
*राजा का पुत्र ही राजा होता है ?*
5000 वर्ष पूर्वी जी चूक द्रुतराष्ट्र यांनी केली आणि त्यामुळे त्याचे काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे
असे असताना तीच चूक आजच्या युगात कोणी केलं ते बघूया
महाराष्ट्र राज्यात शरद पवार,स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असे अनेक मोठे नाव बघायला भेटतात ज्यांनी उत्तम प्रकारे राजकारण, समाजकारण,देश पातळी वर केले
पण चूक मात्र एकच केलं ते म्हणजे *राजा का पुत्र ही राजा होता है*मित्राने मी का हे सांगतोय अनेक राज्यातले राजकीय कार्यकर्ते सांगतात शरद पवार यांनी अजित पवार यांना उत्तराधिकारी नेमावे ,बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना उत्तराधिकारी नेमावे , गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना नेमावे , पण म्हणतात ना माणूस कितीही बुद्धीमान असो बलवान असो पुत्र ,पुत्री मोहमाया या मध्ये तो निर्णय घेताना चुकतोच तसेच काही लोकप्रतिनिधी व पक्ष अध्यक्ष यांनी घेतलेले निर्णय हे आज त्यांच्या पक्षात जी खिंडार पडतीये त्याचे जिवंत उदाहरण आहे
म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुतणे राज ठाकरे यांना तेव्हाच त्यांचं अधिकार दिला असता आज ही वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली नसती.
आज शरद पवार यांनी वेळेत अजित पवार यांना त्यांचे अधिकार दिले असते तर आज अजित पवार यांनी पक्ष तोडला नसता शेवटी जैसे को तैसा म्हणावा लागेल.
गोपीनाथ मुंडे हे काही कार्यकर्ते यांच्या मनातील देव मानले जायचे परंतु त्यांनीही पुतणे धनंजय मुंडे यांना वेळीच अधिकार न दिल्यामुळे आज पंकजाताई एकटे पडले व भाजप त्यांच्या बरोबर किती अन्याय करतीये हे सगळ्यांनी पाहिले
म्हणून महाभारत सगळ्यांना माहीत जरी असला तरी प्रत्यक्षात त्याबद्दल अमल कोणीच नाही केलं म्हणून ज्या पद्धतीने द्रुतराष्ट्र यांचे साम्राज्य गेले तसेच आज महाराष्ट्र राज्यात ही बघायला भेटत आहे.

