, पालघरवासीयांवर निर्बंध कायम राहणार; ‘हे’ आहे कारण
लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हा कोकण विभागात आघाडीवर होता. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्याचे लसीकरण त्या तुलनेत प्रचंड कमी होते. मात्र तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने ठाणे जिल्हा लसीकरणामध्ये पिछाडीवर राहिला आहे
ठाणे पालघर (प्रतिनिधी)लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हा कोकण विभागात आघाडीवर होता. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्याचे लसीकरण त्या तुलनेत प्रचंड कमी होते. मात्र तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने ठाणे जिल्हा लसीकरणामध्ये पिछाडीवर राहिला आहे. ९० टक्के लसीकरण पूर्ण न झाल्याने ठाणे आणि पालघर जिल्हा निर्बंधमुक्तीपासून दूर राहिला आहे.