संगमनेर प्रतिनिधी सतीश फापाळे
संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी ते आंबी दरम्यान, ज्या पुलाचे खडे आरपार झाले होते व शाळकरी मुलांना खड्यात पडून दुखापत झाली होती . असा जीवघेणा प्रवास कधी थांबणार अशी बातमी जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्त पत्राने प्रसारित केली होती. त्यामुळे संगमनेर ते अकोले परिसरात सर्वत्र पसरताच आमदार किरण लाहमटे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवरतीय सभापती अजय फटांगडे यांनी वृत्तपत्राच्या बातमीची दखल घेत, ज्या ठेकेदारांनी पुलाचे काम केले, त्यांना त्या कामची ताबडतोब दुरुस्ती करून देण्याचे आदेश दिले. व ते काम 3 दिवसात चालू झाले !!!
या कामासाठी म्हसवंडी गावातील सरपंच व उपसरपंच व कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून व जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीमुळे ,म्हसवंडी गावातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास कुठेतरी थांबणार अशी अपेक्षा, बाळगत नागरिकांनी मानले आभार.
प्रसारित झालेली बातमी


